टचस्क्रीनची चिंता नको!
नव्वदच्या दशकापर्यंत लँडलाइन फोन हीच चैन होती. पुढे कॉर्डलेस आल्यानंतर फोनच्या वापरामध्ये आणखी सुलभता आली. त्यानंतर मोबाइलचा विचार पुढे आला....
नव्वदच्या दशकापर्यंत लँडलाइन फोन हीच चैन होती. पुढे कॉर्डलेस आल्यानंतर फोनच्या वापरामध्ये आणखी सुलभता आली. त्यानंतर मोबाइलचा विचार पुढे आला....
सौर ऊर्जेवर चालणार्या बोन्साय झाडाची निर्मिती एका फ्रेंच डिझायनरने केली असून हे झाड कॉफी टेबलची केवळ शोभाच वाढवत नाही तर...
' सुपर - सुपरकॉम्प्युटर ' च्या निर्मितीसाठी भारत , चीन , जपान , अमेरिका यांच्यात सुपरकॉम्पिटीशन सुरु झाली आहे . येत्या आठ वर्षात सुपर - सुपर कॉम्प्युटर तयार होईल . निर्मितीत भारत सगळ्यांवर मात करेल . अगदी चीनवर सुध्दा , असा विश्वास सुपर कॉम्पुटरचे जनक डॉ . विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे . गेल्या शतकात मानवी जीवनात तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला तो संगणकानेच . पाश्चात्यांकडून आपण ते तंत्रज्ञान आयात केलं . त्यानंतर झालेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे महासंगणक ( सुपर कम्प्यूटर ). पाश्चात्यांनी हे तंत्रज्ञान आपल्याला देण्याचे नाकारले . भारताचे प्रसिध्द वैज्ञानिक डॉ . विजय भटकर यांनी हे आव्हान स्विकारले आणि भारतानेच महासंगणक तयार केला. भारताच्या याच सुपुत्राने आता महा - महासंगणक तयार करण्याचा ध्यास घेतलेला आहे . आजचा सुपर कम्प्यूटर म्हणजे उद्याचा लॅपटॉप ' तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलते आहे . प्रत्येक क्षणी एक नवे तंत्रज्ञान जन्माला येत आहे . आजचा सुपरकम्प्यूटर हा उद्याचा लॅपटॉप झालेला असेल . त्यामुळे बदलत्या काळासोबत अपडेट राहणे आवश्यक आहे . हे जरीखरे असले तरीसुध्दा इतरांच्या एक पाऊल पुढे जाण्याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे . याच गरजेतून२००८ साली महा - महासंगणकाची संकल्पना पुढे आली . २०१० साली याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्यातआला . हा प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी ११ हजार कोटीं रूपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले आहे .बाराव्या पंचवार्षिक योजनेत शासनाने त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी मान्य केला ,' अशी माहिती डॉ . भटकरयांनी मटाशी बोलताना दिली . अडचणच असते ' इनोव्हेशनची ' जननी ' एक अब्ज अब्ज प्रक्रिया ( एक ' एक्झा ') एका सेकंदात करण्याइतकी गती या संगणकाची असेल . परिणामतःत्यासाठी ' ५ हजार मेगा वॅट ' इतकी उर्जा लागणे अपेक्षित आहे . मात्र उर्जेचा तुटवडा असताना एवढी वीज केवळएका प्रकल्पासाठी देणे भारताला अशक्य आहे . त्यामुळे २० मेगा वॅट विजेच्या सहाय्याने हे काम कसे करता येईलयासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . एखादे मोठे ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येतात . मात्र याच अडचणी 'इनोव्हेशन्स ' ला जन्म देतात आणि त्यातूनच ध्येय साध्य होते ' असे त्यांनी सांगितले . एका चिपवर हजारो प्रोसेसर कमी उर्जेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका चिपवर हजारो प्रोसेसर्स लावण्यात येतील . त्यांना ' नेटवर्किंग ' च्यासाहाय्याने कनेक्ट करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले . २०२० ला साकारणार महा - महासंगणक हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आमच्या पुढे आहे . या प्रकल्पात आपण ' मेंटॉर ' म्हणून कार्यरतअसल्याचे डॉ . भटकर यांनी सांगितले . सामान्य माणूसही वापरेल महा - महासंगणक हा संगणक तयार झाल्यानंतर ' नॅशनल नॉलेज नेटवर्क ' अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठांना हा जोडण्यात येईल .त्यामुळे अगदी शेतात बसलेल्या शेतकऱ्यालासुध्दा आपल्या ' ४ जी ' सुविधेद्वारे या संगणकाशी कनेक्ट होता येईल. अर्थातच त्याच्या वापरासाठी काही नियमसुध्दा घालून दिल्या जातील . या संकल्पनेवर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
भारतीय वंशाच्या संशोधकांची किमया जगातील सर्वाधिक वेगवान आणि अचूक गणिती प्रक्रिया करणारा कम्प्युटर विकसित करण्यात आला असून , मानवी मनातील भावना आणि विचारांच्या माध्यमातून त्याची हाताळणी शक्य असल्याचा दावा भारतीय वंशाच्या संशोधकाने केला आहे . या विशिष्ट कम्प्युटरचा फायदा शारिरीकदृष्ट्या अपंगांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्टकेले . अचूकता आणि गतिमानता यांच्या बरोबरीने नैसर्गिकरित्या चलनवलन ही या कम्प्युटरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत .स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मानवी मेंदूमध्ये बसविता येईल , अशी कृत्रिम प्रणाली निर्माण केली असून , ' रीफिट ' असे तिचे नामकरण करण्यात आले आहे .या प्रणालीसाठी आज्ञावलीदेखील ( अल्गोरिदम ) तयार करण्यात आली आहे . या प्रणालीच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या मानवी मज्जासंस्थेतून ( न्यूरल प्रोस्थेटिक ) कम्प्युटरच्या कर्सरवर नियंत्रण ठेवता येणार आहे . ' या प्रणालीच्या माध्यमातून शरीरावरील नियंत्रण हरवून बसलेल्या व्यक्तीदेखील सर्वसामान्यांनुसार कम्प्युटरची हाताळणी सहजरीत्या करू शकेल ,' असा विश्वास भारतीय वंशाचे संशोधक कृष्णा शेणॉय यांनी व्यक्त केला . ही प्रणाली मानवी मेंदूत बसविलेल्या सेन्सरद्वारे कार्यरत राहील . सेन्सरद्वारे होणारी प्रत्येक हालचाल अथवा कृती रेकॉर्ड करण्यात येईल . तसेच ती माहिती ' डेटा ' स्वरूपात कम्प्युटरकडे पाठविण्यात येईल , असेही शेणॉय यांनी नमूद केले . या संशोधनासाठी शेणॉय यांना डॉ . विकाश गिल्जा यांनी सहकार्य केले . हे महत्त्वपूर्ण संशोधन ' नेचरन्युरोसायन्स ' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे .
वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे . युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात . फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे . या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे . जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech